- प्रशासन आपल्या दारी अभियानाचा ब्रेक द चैन मुळे उडाला फज्जा
यवतमाळ (नेर) -
प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची कागदपत्रे मिळणे अशक्य झाले आहे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी जमीनीच्या नकाशाची गरज पडत आहे परंतु 31 मे पर्यंत भूमी अभिलेख कार्यालय बंद राहणार असे अधिकारी सांगित आहे. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालये बंद असल्यामुळे कागदपत्रांअभावी पिक कर्जा पासून वंचित राहावे लागले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या धोरणेमुळे प्रशासन आपल्या दारी अभियानाचा ब्रेक द चैन मुळे फज्जा उडत असल्याची ओरड आता नागरिक करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर शासकीय कार्यालये उघडण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनकडुन केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.