Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अक्षय तृतीया नीमीत्य अन्नदान, ब्लॅकेंट व ग्रामगीते चे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रमजान ईद ला मुस्लिम समाजातील गरजुंना ब्लेँकेट वाटप रामचंद्र (रामा) घटे यांचा स्तूत्य उपक्रम अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजु...

  • रमजान ईद ला मुस्लिम समाजातील गरजुंना ब्लेँकेट वाटप
  • रामचंद्र (रामा) घटे यांचा स्तूत्य उपक्रम
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचा असलेला अक्षय तृतीया हा सण तसेच  रमजान ईद या दोन्ही सनांचे अवचीत्य साधत रामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र (रामा) घटे यांनी रामपूर येथील अनाथ बालग्रूह, चूनाळा येथील गोरक्षण केंद्र, वेकोली येथील कंत्राटी कामगार व मुस्लिम समाजातील गरजूना ब्लेँकेट, अन्नदान, ग्रामगीता आदींचे मोफत वाटप केले.

गेल्या अनेक वर्षापासुन घटे यांनी अविरतपणे हे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. यापूर्वी अगदी नागपूर,चंद्रपुर  येथील अनाथालयासाठी पण त्यांनी अन्नदान केले आहे. हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीया या मुहूर्तांला अनन्य साधारण असे महत्व आहे. या दिवशी अनेक चांगले कार्य केले जातात. त्यामुळे आपल्या परिवारातील  स्वर्गवासी झालेल्या आप्तस्वकीयांच्या स्मर्णाथ घटे परिवाराकडून हे कार्य केले जाते. रामपूर येथील स्वामी विवेकानंद अनाथ बालग्रूह व चूनाळा येथील नारायणदास मावानी गोशाळा येथे ब्लेंकेट ,अन्नदान व ग्रामगीता पुस्तके वितरित करण्यात आले. वेकोली येथील कंत्राटी कामगारांनाही ब्लेंकेट व अन्नदान तर रमजान ईद नीमीत्य मुस्लिम समाजातील गरजूना ब्लेंकेट वितरित करण्यात आले. रामचंद्र घटे यांच्या पत्नी सुनंदा, मुलगा आकाश व मुलगी वैष्णवी यांची साथ त्यांना नेहमी मिळत असते. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, स्वामी विवेकानंद अनाथ बालग्रूह चे मारोती गव्हाणे, चूनाळा येथील गोशाळेचे दिलीप म्हैसणे, संतोष नांदेकर आदिंची उपस्थिति होती.

कोविड नियमांचे काटेकोरपने पालन करण्यात आले. घटे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कोविड काळात आपली सामाजिक बांधिलकी जोपासत ज्याला जे शक्य होईल तेवढे सहकार्य एकमेकांना केले पाहिजे आणि या कठीण प्रसंगाचा न घाबरता सामना केला पाहिजे असे मत रामचंद्र घटे यांनी यावेळी व्यक्त केले. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top