- मागील 24 तासात 186 जणांनी कोरोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 106 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 946 झाली आहे. सध्या 2725 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 82 हजार 150 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 49 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये नागभिड येथील 74 वर्षीय पुरूष, चिमुर येथील 57 वर्षीय पुरूष व घुग्घुस येथील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 435 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 395, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 364 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 124, चंद्रपूर तालुका 44, बल्लारपूर 14, भद्रावती 18, ब्रम्हपुरी 24, नागभिड 14, सिंदेवाही तीन, मूल 12, सावली 11, गोंडपिपरी तीन, राजूरा सहा, चिमूर 31, वरोरा 20, कोरपना 18, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 11 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.