- सावली पत्रकार संघाची मागणी
सावली -
गत वर्षीपासून करोनाचा प्रभाव संपुर्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढत असताना पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांचा मुत्यू झाला आहेत. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत तरी त्यांच्या वारसांना किमान पन्नास लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री तथा राज्य शासनाकडे सावली पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल स्वामी यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि महाराष्ट्रात करोनाची भीषण दूसरी लाट मोठ्या वेगाने पसरत असुन या लाटेमूळे अनेक नागरीकांचे धोक्यात आले आहे. या महामारीत अनेक कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांचे जिव जात आहे. सोबतच या सगळ्या परिस्थितीच्या आढावा घेणारे पत्रकार हे वेळोवेळी बातम्या घेण्यासाठी गावोगावी फिरत असतात कशातच अनेक पत्रकारांना करोनाची लागन झाल्याने अनेक पत्रकारांना आपल्या जिव गमवावा लागला आहे. या मृत पावलेल्या पत्रकारांचे संसार आता उघड्यावर पडले असून त्यामुळे राज्य शासनाने या पत्रकाराना कोणतीही अट न लावता सरसकट करोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र शासन तथा केंद्र शासनातर्फे ५० लाखाची आर्थिक मदत देण्याची मागनी अनिल स्वामी यांनी यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.