- पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
राजुरा -
राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर वसलेल्या माणोली बूज ग्रामपंचायत मधील सुमारे २५० कुटुंबांच्या लोकवस्तीचे बाबापूर या गावात पाणी टंचाईची समस्या आता उग्र बनली असून गावातील काही नागरिक नळ योजनेने दिलेल्या नळाला पाणी पंप (टिल्लू पंप) जोडून पाणी घेत आहे.
त्यामुळे जलकुंभातील पाण्याची धाव त्या लावलेल्या पंपा कडे होत असल्याने गावातील नागरीकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे. तरी ही ग्रामपंचायत माणोली बूज यांचे या गंभीर प्रकरणी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
गांवातील नागरिकांनी त्या पंप धारकांना वारंवार कान उघाडणी करून देखील त्यांच्यात काळी मात्र बदल पडला नाही या मुळे बाबापूर गावात पंप जोडणी केलेल्या नागरिकांनबद्दल आक्रोश निर्माण होत आहे. ग्रावकऱ्यानी ग्राम पंचायतीला टिल्लू पंप लावून पाणी खेचणाऱ्या नळ धारकांचे नळ कनेक्शन खंडित करत दंड वसूल करून पंप जप्त करण्याची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.