नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांच्या उपस्थित सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील तसेच त्यांना रात्री 11 पर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.
शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मीक स्थळाच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावी. अभ्यागतांकरिता ऑनलाईन आरक्षणासारख्या सोयीची सुरवात करावी. तसेच या ठिकाणी प्रवेशाकरिता मास्कचा वापर बंधनकारक राहील. तसेच प्रवेशस्थळी तापमान मोजण्याचे साधन, परिसरातील प्रत्येक ठिकाणी हात धुण्याकरिता साबन अथवा सॅनिटायजर्स ठेवावी.
यापुर्वीच्या नियमांसोबतच वरील निर्देशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.