- आतापर्यंत 23,128 जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह 588
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 116 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 128 झाली आहे. सध्या 588 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 21 हजार 63 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 94 हजार 726 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 120 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर सात, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी तीन, नागभिड एक, सिंदेवाही तीन, मुल दोन, राजूरा सहा, वरोरा 62 व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.