- विदर्भ, मराठवाडा, खान्देशच्या जनतेची थट्टा करणारा अपयशी महाविकास आघाडी सरकारचा अर्थहीन व दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टिका विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
- राज्य सरकारचा अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षा भंग करणारा- डॉ. मंगेश गुलवाडे
गेल्या ६१ वर्षात प्रथमच राज्याचे दरडोई उत्पन्न १३३४६ रू. ने कमी झाले आहे, पण कोणतीही गरीब कल्याण योजना अर्थमंत्र्यांनी घोषीत केली नाही. जागतीक महिला दिनी अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, महिलांसाठी भरघोस तरतूद होईल अशी अपेक्षा होती. मात्र किरकोळ घोषणा करून महिलांना सुध्दा या सरकारने न्याय दिला नाही. डोंगर खणला, उंदीर निघाला या म्हणीच्या पूढे जात डोंगर खणला आणि उंदराचे चित्र निघाले अशी अवस्था या अर्थसंकल्पाची आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातुन शक्तीशाली महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध अर्थमंत्री घेतील अशी अपेक्षा होती. मात्र कोरोना काळात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुध्दा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातुन केला गेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांचे शपथनामे, वचननामे यांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र राज्यातील कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्या तोंडाला अर्थमंत्र्यांनी पाने पुसल्याची टिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.