- आतापर्यंत 22,893 जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह 181
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 471 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 893 झाली आहे. सध्या 181 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 11 हजार 294 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 86 हजार 140 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 397 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 359, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 34 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 10, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपूर एक, भद्रावती नऊ, मुल दोन, सावली एक, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमुर एक व वरोरा येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.