गडचांदूर -
गडचांदूर येथे नव्याने शासकीय आदिवासी वसतिगृह इमारतीत स्थलांतर करण्यापूर्वी मुला-मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय योजना करूनच सदर वसतिगृह स्थलांतर करण्यात यावे. यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली, शाखा राजुरा चे वतीने आमदार सुभाष धोटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची आमदार सुभाष धोटे यांनी वेळीच दखल घेऊन आदिवासी मंत्री नामदार के.सी. पाडवी यांना व प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग यांचेसी चर्चा करून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे आश्र्वासन देण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश कुळमेथे, जिल्हा संघटक विश्वेश्वर मडावी, विदर्भ सचिव महिपाल मडावी, तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, उपाध्यक्ष नितीन सिडाम, तालुका उपाध्यक्ष अमृतराव आत्राम, युवा सचिव दिपक मडावी तसेच इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.