Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हिरापूर येथे शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण व महिला सबलीकरणाच्या माध्यमातून विकासासाठी चेतना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोरपना - अंबुजा सिंमेट फाउंडेशन उपरवाही यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरापूर येथे शे...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना -
अंबुजा सिंमेट फाउंडेशन उपरवाही यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिरापूर येथे शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण व महिला सबलीकरण कार्यक्रमाअंतर्गत गावातील सर्व महिला, बचत गटातील महिला सदस्या तथा गावकरी यांच्या उपस्थितीत गावचे नवनिर्वाचित उपसरपंच तथा माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. 

यावेळी प्रमुख पाहुणे शा.व्य.समितीचे अध्यक्ष मारोती दादाजी बत्की, स्वराज किसान गृपचे सचिव दत्ताभाऊ डाहुले, ग्रामपंचायत सदस्या सौ. पावडेताई, सौ. सिडामताई, सौ. शेंडेताई, वाघमारे सर, अलोने सर, गोखरे सर, धवने सर, आयोजक पेंदोर सर व त्यांचे सहकारी मंडळी यांच्या सहकार्याने कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. 

यावेळी खेळाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील महिलांनी हिरहिरीने रांगोळी स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, शेतीविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतला. प्राविण्य मिळविणाऱ्या महिला गटाना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गावातील ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, महिला मंडळ तथा गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top