Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खोडकिडीच्या प्रादुर्भावमुळे तळोधी (बाळापू ) परिसरातील धानपिक धोक्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याचे खासदार अशोक नेते यांचे प्रशासनास निर्देश खासदार अशोक नेते यांनी जाणल्या नांदेड, येनोली माल...

  • रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याचे खासदार अशोक नेते यांचे प्रशासनास निर्देश
  • खासदार अशोक नेते यांनी जाणल्या नांदेड, येनोली माल, गिरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
नागभीड -

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 12 ऑक्टोबर रोजी नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर परिसरातील  नांदेड, येनोली माल, गिरगाव इत्यादी गावांमध्ये दौरा करून धानपिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीचंदजी गणवीर, भाजपचे नेते माजी तालुकाध्यक्ष होमदेवजी मेश्राम, नागभीडचे तालुकाध्यक्ष तथा पं स सदस्य संतोष रडके, तहसीलदार चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, नांदेड चे माजी जिप सदस्य शब्बीर शेख, परिशजी शेंडे, भोजराज जी लांजेवार, माजी पोलीस पाटील हिराचंदजी बारसागडे, व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक नेते  यांनी शेतकऱ्यांना विचारणा केली असता   नामदेव आत्राम, बालबुद्धे, गफ्फुर शेख, मधुकर कोसरे, या शेतकऱ्यांनी धानापिकाला खोडकीळ, मावा, तुडतुडा, करपडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव झालेला असून हातात आलेले पीकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेकदा फवारणी करुनही काहीही फायदा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धानपिक पूर्णत गेल्याने सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top