Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणा...

  • आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार पूर्ववत सुरू होणार असून राज्य शासनाने दि. 14 ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश निर्गमित केला आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान आठवडी बाजार बंद करण्यात आले होते मात्र टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाल्यानंतर सुद्धा आठवडी बाजार सुरू न झाल्यामुळे या आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आल्याने त्यांनी आ. मुनगंटीवार यांची भेट घेतली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी पत्रव्यवहार करत चर्चा केली. त्यांनी सुद्धा याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फ्लस्वरूप राज्य शासनाच्या मदतकार्य व पुनर्वसन विभागाने दि.14 ऑक्टोबर रोजी आदेश निर्गमित करून दि. 15 ऑक्टोबर पासून राज्यात आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सॅनिटायझर, मास्क चा वापर, गर्दी न करणे, दोन दुकानांमध्ये सुरक्षित अंतर आदी खबरदारी बाळगून राज्यात आठवडी बाजार सुरू होणार आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आठवडी बाजारावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top