Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरक्षण निर्णय आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आबिद अली यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्र्यांना आरक्षणाच्या मागणीचे दिले निवेदन हाजी सय्यद हारून यांच्या नेतृत्वात आरक्षण निर्णय आंदोलन समिती ...

  • आबिद अली यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्र्यांना आरक्षणाच्या मागणीचे दिले निवेदन
  • हाजी सय्यद हारून यांच्या नेतृत्वात आरक्षण निर्णय आंदोलन समिती चंद्रपूर चे बांधव एकवटले
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

संपूर्ण राज्यभर मुस्लिम आरक्षण आंदोलन समितीच्यावतीने मंत्री खासदार आमदार यांना मुस्लिम समाजाच्या सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक स्थिती अतिमागास झाली असल्याचे चित्र न्यायमूर्ती सच्चर आयोग डॉ. म हेमदुररहमान समितीच्या अहवालात मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचा विदारक चित्र समोर आले. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे मुस्लिम समाज हा दुर्लक्षित राहिल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत मागासलेला आहे. यापूर्वी न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाची गरज नमूद केली मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुस्लिम समाज नेहमी अन्यायाचा बळी ठरला आहे. आज मुस्लिम समाजाची आर्थिक अत्यंत गंभीर असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागासलेपण असल्याने विकासाच्या प्रवाहापासून मुस्लीम समाज पिछाडीवर गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री यांना मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावा शैक्षणिक प्रगती साध्य करण्यासाठी आश्रम शाळेच्या धर्तीवर मुस्लिम निवासी शाळा सुरू करण्यात याव्या सातत्याने समाजावर होणारे अन्याय अत्याचार अशा गंभीर घटना ला आळा घालण्यासाठी ॲट्रॉसिटी मुस्लिम संरक्षण कायदा तयार करण्यात यावा. सेवेमध्ये मुस्लिम समाजाचा वाटा अत्यंत चिंताजनक असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावं याकरिता आज आमदार वडेट्टीवार यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारत शासन स्तरावर आरक्षण मागणीचा विचार करु, मुस्लीम समाजाला विकासाचा प्रवाहा पासुन दुर ठेवता येणार नाही हे वास्तव्य खरे आहे, शासन विचार करेल मी आरक्षणाच्या मागणी चा पाठपुरावा करण्याकरिता प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी वडेट्टीवार यांनी दिली. 

यावेळी सय्यद आबीद अली, एड. शाकीर मलक, हाजी हारून भाई, मोहम्मद कादर शेख, जावेद सिद्दीकी, अतिक कुरैशी, सुहेल शेख, नाजीर कुरैशी, शफी शेख, शकील शेख, शाहीन शेख, मल्लेका, अंजुमनफीसा, शिरीन कुरेशी, राजिया सुल्ताना यांचेसह जिल्हयातुन आलेले मोठ्या संख्येने महिला व पुरूष उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top