Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अंतर्गत कवी संमेलनाचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शासनाच्या मोहीमेला सहकार्य : फिनिक्स साहित्य मंचाचा जनजागृतीसाठी पुढाकार श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - सध्या कोरोना महामार...

  • शासनाच्या मोहीमेला सहकार्य : फिनिक्स साहित्य मंचाचा जनजागृतीसाठी पुढाकार
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -

सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे. महाराष्ट्र शासन कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखत असून ११ सप्टेबरच्या शासन निर्णयानुसार सर्व नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. सदर मोहिम १५ सप्टेबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान राबविली जात आहे. यात आरोग्य पथक प्रत्येकाचे घरी जाऊन तपासणी करत असून उपचार व आरोग्य शिक्षण देत आहे. सदर विषयावर कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त फिनिक्स साहित्य मंचाने कविसंमेलनाचे आयोजन केले असून जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.

शासनाची महत्वपूर्ण मोहिम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृत्ती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा तालुक्यातील गावात कलापथकातून जाणिव जागृती करण्यात आली. जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहीमेचा विशेष प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने प्रसिद्ध कवी, निवेदक नरेशकुमार बोरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त २० ऑक्टोंबरला ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर कविसंमेलन प्रसिद्ध युवा कवी व कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांच्या अध्यक्षतेत होईल. संचालन कवी मिलेश साकुरकर तर आभार कवी नरेशकुमार बोरीकर करतील. कवीसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन पोंभुर्णा गटविकास अधिकारी तथा कवी संमेलनाचे संयोजक धनंजय साळवे, कवी विजय वाटेकर, कवी नरेंद्र कन्नाके यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील असे कळविण्यात आले आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top