Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धर्मेंद्र बरोबर जास्त वेळ घालवता आला नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
परंतु आम्ही जितका वेळ एकत्र घालवला तो अमुल्य होता - हेमामालिनी लग्नाच्या 40 वर्षानंतर ड्रिम गर्लचा खुलासा हेमामालिनी म्हणाल्या - मी माझा वेळ...

  • परंतु आम्ही जितका वेळ एकत्र घालवला तो अमुल्य होता - हेमामालिनी
  • लग्नाच्या 40 वर्षानंतर ड्रिम गर्लचा खुलासा
  • हेमामालिनी म्हणाल्या - मी माझा वेळ माझ्या प्रेमाबद्दल तक्रार करण्यात घालवला नाही
मैथिली माहेश्वरी - आमचा विदर्भ प्रतिनिधी
मुंबई -

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 40 वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. पण हेमामालिनी यांनी सांगितल्यानुसार, धर्मेंद्र यांनी त्यांना लग्नानंतर जास्त वेळ दिला नाही. 16 ऑक्टोबर रोजी हेमामालिनी यांनी वयाची 72 वर्षे पूर्ण केली. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांना आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचा बदल करु इच्छितात का? असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर त्यांनी आपले मन मोकळे केले.

'आम्ही एकत्र घालवलेला वेळ अनमोल होता'
स्पॉटबॉयशी बोलताना हेमा म्हणाल्या, "आयुष्यात काहीही बदल करायचा आहे, असे मला वाटत नाही. मला धरमजीबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही. पण ते ठीक आहे. आम्ही एकत्र घालवलेला सर्व वेळ अमूल्य होता. आम्ही 'तू हे का केले नाहीस?', 'त्याने असे का केले नाही?', 'तुला उशीर का झाला?' अशा गोष्टींमध्ये अडकलो नाही."

1979 मध्ये हेमा-धर्मेंद्र यांनी केले होते लग्न
21 ऑगस्ट 1979 रोजी हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. असे म्हणतात की, ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 'आसमान महल' चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी 1965 मध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. मात्र 'शोले' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात सूत जुळले. हेमा या धर्मेंद्र यांच्या दुस-या पत्नी आहे. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव असून सनी देओल आणि बॉबी देओलच्या त्या आई आहेत.

लग्नानंतर हेमा कधीच धर्मेंद्र यांच्या घरी गेल्या नाहीत
राम कमल मुखर्जी यांच्या 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकानुसार हेमा लग्नानंतर धर्मेंद्र यांच्या घरी कधीच गेल्या नाहीत. हेमा यांनी सांगितल्यानुसार, मला कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरम जी यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलींसाठी जे केले त्याबद्दल मला आनंद आहे. त्यांनी वडिलांची भूमिका चांगली निभावली. आजही मी काम करते आणि आपला मान कायम राखण्यात सक्षम आहे. कारण मी माझे जीवन कला आणि संस्कृतीशी जोडले आहे."

हेमा म्हणाल्या- मी प्रकाश यांचा खूप आदर करते
हेमा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या- ''मी कधी प्रकाश यांच्याविषयी काही बोलत नसले तरी मनापासून त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलींनाही धरमजींच्या कुटुंबाबद्दल पूर्ण आदर आहे. जगाला माझ्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. पण मला ते सांगण्यात रस नाही.'' 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top