Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गांधीजी म्हणजे अहिंसेच्या माध्यमातून जगाला प्रेम शिकवणारा महात्मा : ना. विजय वडेट्टीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
खासदार बाळू धानोरकर, माजी प्रधान सचिव किशोर गजभिये, प्रकाश देवतळे, रामू तिवारी प्राधान्याने उपस्थित 150 व्या जयंती महोत्सवात पालकमंत्री यांच...

  • खासदार बाळू धानोरकर, माजी प्रधान सचिव किशोर गजभिये, प्रकाश देवतळे, रामू तिवारी प्राधान्याने उपस्थित
  • 150 व्या जयंती महोत्सवात पालकमंत्री यांच्याकडून अभिवादन
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला  प्रेम करायला शिकवणारा महात्मा म्हणून  महात्मा गांधींची ओळख आहे. विसाव्या शतकातील सर्वात लोकप्रिय व जगावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे. महात्मा गांधी एक विचार असून तो कायम आमच्यात राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्तीव्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ते म्हणाले, भारतातच नाही तर जगभरात या दोन्ही महान नेत्यांची जयंती साजरी केली जात आहे. केंद्र व राज्य सरकार हे वर्ष महात्मा गांधींचे 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे करीत असून या आमच्या आधीची पिढी या महामानवाच्या परीस स्पर्शाने पावन झाली आहे. त्यांची शिकवण ही कायम प्रेरणादायी असून मानवतेच्या इतिहासात अहिंसेच्या मार्गाने त्यांनी दिलेला स्वातंत्र्याचा लढा अजरामर झाला आहे.

यावेळी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या समवेत, खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, माजी प्रधान सचिव किशोर गजभिये, प्रकाश देवतळे, रामू तिवारी प्राधान्याने उपस्थित होते.

2 ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. अहिंसेचा मार्ग अनुसरून स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते असे महात्मा गांधी यांनी जगाला शिकवले. जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला 'बापू' हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला. अहिंसा ही एक व्यक्तीगत सवय असून कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवले जाऊ नये असा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खासदार बाळू धानोरकर यांनी देखील या वेळी महात्मा गांधी यांना आदरांजली व्यक्त केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top