- आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आठवडी बाजार सुरू करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला केली होती सूचना
- भाजपा तर्फे भाजी विक्रेत्यांना मास्क चे वितरण
बल्लारपूर -
आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असतांना व महाराष्ट्र सरकार मिशन बिगेन अंतर्गत सर्व सेवा हळूहळू सुरू करीत असताना शासनाच्या निर्देशानुसार 15 ऑक्टोबर पासून राज्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
शिवाय महाराष्ट्र राज्याचे माजी वित्त वन व नियोजन मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आठवडी बाजार सुरू करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला सूचना केली होती. यानुसार आज बल्लारपूर शहरातील आठवडी बाजार भरल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी बल्लारपूर शहरातील आठवडी बाजार हा बचत भवन परिसर व सार्वजनिक वसंत वाचनालयाच्या मागील परिसरात भरायचा मात्र सद्यस्थितीत त्याठिकाणी दुकान संकुलाचे काम सुरू असल्याने आठवडी बाजार नगर परिषद पासून ते कॉलरी मार्गाने महात्मा गांधी पुतळा परिसर पर्यंत भरत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, माजी अध्यक्ष शिवचंद्र द्विवेदी, महासचिव मनीष पांडे, निलेश खरबडे, गणेश चौधरी, सतीश कनकम, घनश्याम बुराड़कर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यांना मास्क चे वितरण केले.
नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, मॉस्क चा वापर करावा, बाजारात येतांना लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना पाठवू नये तसेच सॅनिटाईजरचा वापर करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे तसेच आठवडी बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी फिरत्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.











टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.