- सेवा सप्ताह निमित्त मासळ येथील बैठक
चिमूर -
मागील दहा महिन्यापासून राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर आहे. तेव्हा राज्य शासनाने कोरोना महामारीत जनतेला मोफत धान्य दिले नाही सिलेंडर चा मोफत पुरवठा केला नाही. वाढलेले विजेचे बिल कमी करण्यात आले नाही. कोरोना काळात राज्य शासनाकडून जनतेला कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही परंतु पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकार कडून धान्य मोफत दिले ३ महिने उज्वला योजने अंतर्गत रसोयी गॅस पुरवली आहे. शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान दिलेत.
राज्याचे मुख्यमंत्री घरून बाहेर निघत नाही. ब्रम्हपुरीत भयानक पूर आले असताना केवळ पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली असली तरी अनेकांच्या खात्यात जमा झाली नाही. कृषी विधेयक वर कांग्रेस आंदोलन करीत आहे. कारण शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करायचा नाही. परंतु मोदी सरकार शेतकऱ्यांना बळकट करणार आहे एक भारत एक संविधान करण्याचे वचन पंतप्रधान मोदीनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन विधेयक आणले आहे. नोट बंदी मुळे काळा पैसा बंद झालेला आहे. कृषी बिल मुळे काळाबाजार बंद होणार आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून लस निर्मिती होईपर्यन्त प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांनी काळजी घेत जनतेची सेवा करण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केले.
मासळ मदनापूर जिप क्षेत्रातील कार्यकर्ता पदाधिकारी कोरोना काळात भाजप सेवा सप्ताह च्या बैठकीत आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते. यावेळी डॉ. श्यामजी हटवादे राजू पाटील झाडे, प्रकाश वाकडे, प्रवीण गणोरकर, डॉ. देवनाथ गंधारे, ओमप्रकाश गणोरकर, गजानन गुळध्ये, समीर राचलवार, असिफ शेख, अशोक कामडी, सुरज नरुले, आदी उपस्थित होते.
डॉ श्यामजी हटवादे यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायदा वर विस्तृत मार्गदर्शन करीत कांग्रेस पक्ष चुकीचा संदेश देत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्रजी मोदीनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदे केले येणारे कायदे ची विस्तृत माहिती कार्यकर्त्या पर्यत बुकलेट च्या माध्यमातून येणार असल्याचे सांगितले. पक्षातील कार्यकर्ता कोरोना ग्रस्त आढळल्यास सहानुभूती म्हणून संपर्कात राहून मदत करण्याचे सांगितले.
माजी सभापती राजू पाटील झाडे म्हणाले की कृषी विधेयक वर विरोधी पक्ष आक्रमक होऊन आंदोलन करीत असले तरी कृषी कायदा मुळे शेतकऱ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगितले मालाची किंमत जरी कोसळली तरी मिनिमम भाव देऊन सरकार खरेदी करणार आहे बाजार समिती ह्या बरखास्त केल्या नसून त्याच स्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. बाजार समितीने शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. मासळ-मदनापूर जिप क्षेत्रातील बूथ अध्यक्ष उपस्थित होते. संचालन गजानन गुळध्ये यांनी केले.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.