Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पाच बाधितांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गेल्या 24 तासात 315 बाधितांची नोंद चंद्रपूर शहर व परिसर 179, चिमूर तालुका 3 पोंभूर्णा तालुका 1, बल्लारपूर तालुका 29 ब्रह्मपुरी तालुका 8, भद्...

  • गेल्या 24 तासात 315 बाधितांची नोंद
  • चंद्रपूर शहर व परिसर 179, चिमूर तालुका 3
  • पोंभूर्णा तालुका 1, बल्लारपूर तालुका 29
  • ब्रह्मपुरी तालुका 8, भद्रावती तालुका 13
  • मूल तालुका 13, राजुरा तालुका 13
  • वरोरा तालुका 19, सावली तालुका 4
  • सिंदेवाही तालुका 4, कोरपणा तालुका 10
  • गोंडपिपरी तालुका 9, नागभीड तालुका 5
  • यवतमाळ जिल्ह्यातील 3
  • भंडारा व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एक
  • असे एकूण 315 बाधित पॉझिटिव्ह ठरले
  • आतापर्यंतची बाधित संख्या 5568
  • उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2416
  • चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 3086 बाधित कोरोनातून झाले बरे
  • वाचा सविस्तर....
file image
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात गेल्या 24 तासात 315 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 5 हजार 568 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले 2 हजार 416 बाधित आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 86 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू वणी, यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू झरी जामणी यवतमाळ येथील 48 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यू घुटकाळा तलाव चंद्रपूर येथील 54 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. 8 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 11 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तर, पाचवा मृत्यू जटपुरा गेट, चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 66 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 60, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ दोन बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरात सर्वाधिक कोरोना बाधित पुढे आले आहेत. 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर व परिसरातील शहरातील 179, चिमूर तालुक्यातील 3, पोंभूर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 29, ब्रह्मपुरी तालुक्यातील 8, भद्रावती तालुक्यातील 13, मूल तालुक्यातील 13, राजुरा तालुक्यातील 13, वरोरा तालुक्यातील 19, सावली तालुक्यातील 4, सिंदेवाही तालुक्यातील 4, कोरपणा तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील 5, यवतमाळ जिल्ह्यातील 3, भंडारा व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 315 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top