- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांची महसुल मंत्र्यांकडे मागणी
- मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचे होत आहे उल्लंघन
महाराष्ट्राच्या हद्दीतील 14 गावांनबाबत वाद निर्माण झाल्याने आंध्र प्रदेश शासनाने या 14 गावांवर दावा करणारी रिट याचीका हैद्राबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. यात हैद्राबाद उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास या गावात हस्तक्षेप न करण्याचा अंतरीम आदेश देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने या अंतरीम आदेशाच्या विरूध्द सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटीशन दाखल केले होते. मा. सर्वोच्च न्यायालयाने हैद्राबाद उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती दिली व याचीका तीन महिन्यात निकाली काढावी असे आदेश दिले होते. हैद्राबाद न्यायालयाने आंध्रप्रदेश शासनास याचीका मागे घेण्यास परवानगी दिली होती. आंध्रप्रदेश शासनाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कोणताही दावा दाखल केलेला नाही.
जिवती तालुक्यातील हि 14 गावे महाराष्ट्राचीच असुन तेलंगना सरकार कडून होत असलेल्या जमीनीच्या मोजणी बाबत प्रशासनाने चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. मोजणी प्रशासनाने तात्काळ थांबवावी असे निर्देश राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.