- राज्यातील रुग्णांची संख्या आता देशात क्रमांक एकवर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ होत असून, गेल्या २४ तासांच २४ हजार ८८६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात नवे रुग्ण सापडण्याचा दर हा ६२ टक्के आहे..... वाचा सविस्तर.....
मुंबई -
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर पोहचली आहे. देशात महाराष्ट्र हे एकटे राज्य आहे की ज्या राज्यात रुग्णांची संख्या इतर राज्यांहून अधिक गतीने वाढत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या आता देशात क्रमांक एकवर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ होत असून, गेल्या २४ तासांच २४ हजार ८८६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात नवे रुग्ण सापडण्याचा दर हा ६२ टक्के आहे.
नवे रुग्ण सापडण्याच्या दरात केवळ दिल्लीच राज्याच्या पुढे आहे. राज्यात १४ दिवस पॉझिटिव्ह असण्याचा ट्रेंड हा २५.१ टक्के इतका आहे. नव्या चाचण्यांची संख्याही राज्यात वाढली असून, आता दर दिवशी राज्यात ८४५१० चाचण्या होत आहेत, यामुळे रुग्णसंख्येत ३३.९६ टक्के वाढ झाली आहे. काल शुक्रवारी राज्यात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या २८ हजार ७२४ वर पोहचली आहे. राज्यात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ६६६ इतकी आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या २१९१ इतकी आहे, तर एकूण रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजार ३०६ इतकी आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण मृतांची संख्या ८०६७ वर पोहचली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.