Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चाळीस वर्षाच्या शेतकरी संघटनेच्या प्रखर लढाईला यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतमाल जीवनावश्यक वस्तू कायद्यातून मुक्त  हा शेतकरी संघटनेच्या अर्थवादी विचारांचा विजय - एड. वामनराव चटप अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजु...

  • शेतमाल जीवनावश्यक वस्तू कायद्यातून मुक्त 
  • हा शेतकरी संघटनेच्या अर्थवादी विचारांचा विजय - एड. वामनराव चटप
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
जीवनावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे, हा युगात्मा शरद जोशी यांच्या विचारांनी चालविलेल्या गेल्या चाळीस वर्षातील संघर्षाचा व शेतकरी संघटनेच्या अर्थवादी विचारांचा विजय असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले आहे. 

सन १९५५ च्या जीवनावश्यक वस्तू कायद्याचा आधार घेऊन शासनाने अन्नधान्य, तेलबिया, डाळी, कांदा, बटाटा व खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत वेळोवेळी नोटिफिकेशन काढून समाविष्ट केले होते. ही बाब शेतकऱ्यांच्या बाजारपेठेच्या स्वातंत्र्याच्या सतत आड येत असल्यामुळे उत्पादनापासून ते साठ्यापर्यंत आणि देशांतर्गत व देशाबाहेरच्या बाजारपेठेत शेतमाल नेतांना विविध अडचणी येत होत्या. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या "आमचा माल, मालक आम्ही,वाटेल तिथे, विकु आम्ही" या स्वातंत्र्य घोषणेच्या आड येत होत्या. 

म्हणून युगात्मा शरद जोशी यांनी १९८० पासून सर्व शेतमाल जीवनावश्यक  कायद्याच्या कचाट्यातून मोकळा करावा, म्हणून ३५ वर्ष शेवटच्या श्वासापर्यंत या मागणीसाठी संघर्ष केला व त्यांचे निधनानंतर शेतकरी संघटनेने या मागणीसाठी सातत्याने अविरतपणे हा लढा सुरू ठेवला. शेवटी कोरोना या जागतिक संकटामुळे व महामारी मुळे जगाची व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. त्यामुळे परिस्थितीनीच सरकारची इच्छा नसतानाही उशिरा का होईना पण रायगडाला जाग आली आणि परिस्थितीनीच जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करून सर्व शेतमाल जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्याच्या कचाट्यातून मोकळे करणे भाग पडले. हे शेतकरी संघटनेचे चाळीस वर्ष शेतकऱ्यांच्या आर्थिक  स्वातंत्र्याकरिता अविरतपणे चालविलेल्या संघर्षाचे यश आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, उन्नतीचा अर्थवादी विचार मांडल्याबद्दल युगात्मा शरद जोशी यांचे स्मरण करीत या निर्णयाबद्दल शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, प्रांताध्यक्ष अनिल घनवट, शैलाताई देशपांडे, राम नेवले, सतीश दाणी, गुणवंत हंगरगेकर, ललित बहाळे, मदन कामडे, मधुकर हरणे, सुधीर बिंदू, सौ.गीता खांडेभराड, कैलाश तंवार, सीमाताई नरोडे, संजय कोले, कडूअप्पा पाटील, विजय निवल, जगदीशनाना बोन्डे, वामनराव जाधव, प्रभाकर दिवे, प्राचार्य अनिल ठाकुरवार, एड. शरद कारेकर, प्रा.रामभाऊ पारखी, राजेंद्रसिह ठाकूर, शालीक नाकडे यांच्यासह राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top