Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयातील १०० खाटांच्या नविन इमारतीचा वापर त्वरीत करण्या संदर्भात मुख्यमंत्रींना पत्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सृजन नागरिक मंच चे संयोजक मिलिंद गड्डमवार यांनी केली मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा तालुक्यातील व शहरातील गरीब व सामान...

  • सृजन नागरिक मंच चे संयोजक मिलिंद गड्डमवार यांनी केली मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा तालुक्यातील व शहरातील गरीब व सामान्य लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून राजुरा येथे १०० खाटांच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. खाटा येऊन पडलेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग राजुरा तालुक्यात व शहरात वाढत असून पाहिजे त्या प्रमाणात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व अद्यावत एम्बुलन्स ची व्यवस्था ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध नसल्याने तसेच बेड्स ची कमतरता जाणवत असल्याने रूग्णांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. शहरातील खाजगी दवाखाने चिकनगुणीया, टाॅयफाईड, मलेरिया व निमोनियाच्या पेशंटने गच्च भरलेली पहायला मिळत असून रूग्णांची प्रचंड प्रमाणावर लुट होत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून गरीब रूग्णांना सरकारी दवाखान्यातच उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे. अशी मागणी सृजन नागरिक मंच चे संयोजक मिलिंद गड्डमवार यांनी केली आहे. 

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असतांना नविन इमारत ही शोभेची वास्तू बनून राहावी हे तर्कसंगत वाटत नाही. याबाबत आपण मा. तहसिलदार साहेब व दंडाधिकारी साहेब यांना योग्य त्या सुचना देऊन नविन रूग्णांची व्यवस्था नव्याने बांधलेल्या इमारतीत करण्यात यावी. तसेच रूग्णालयातील आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेण्यात यावा. अशी मागणी केली आहे. 

राजुरा शहरातील रूग्णांचे वाढते प्रमाण व गांभिर्य लक्षात घेता आणि खाजगी डाॅक्टर्स मंडळींकडून होणारी रूग्णांची लुट लक्षात घेता कुठलाही विचार न करता आपणं नविन इमारत वापरात आणून वाढीव बेड्स, ईसीजी मशीन, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर इ. ची व्यवस्था करावी. तसेच एम.डी डाॅक्टर, आरोग्य सेवक, परिचारीका इ. कर्मचाऱ्यांची स्थायी तत्त्वावर नियुक्ती करण्यात यावी. कोरोनाच्या काळात डाॅक्टर्स व आरोग्य सेवेत येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपला जीव धोक्यात घालून काॅनट्रक्ट बेसीसवर आपली सेवा द्यावी अशी राज्य सरकारची इच्छा असेल तर ती चुकीची ठरते आहे. सरळ भरती पध्दतीत कुठलीही अडवणूक करता कामा नये. कारण जनतेचा जीव महत्त्वाचा असल्याकारणाने त्वरीत भरती प्रक्रिया अंमलात आणून आरोग्य सुविधा देण्यात यावी अशी मागणी 'सृजन नागरिक मंच' राजुरा च्या वतीने करण्यात आलेली आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top