Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ दीक्षाभूमीवर यंदा सोहळा साधा !
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
यंदाचा ६४वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साधेपणाने होणार आयशा - प्रतिनिधी नागपूर - देश-विदेशातील लाखो अनुयायांच...

  • यंदाचा ६४वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साधेपणाने होणार
आयशा - प्रतिनिधी
नागपूर -
देश-विदेशातील लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ असलेल्या दीक्षाभूमीवरील यंदाचा ६४वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साधेपणाने होणार आहे. त्यानुसार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. करोनासंकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीने शुक्रवारी जाहीर केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त आवश्यक ते विधी स्मारक समितीच्या मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडतील. दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येत बौद्ध अनुयायी दरवर्षी येत असतात. ही गर्दी लक्षात घेता यंदा सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे शक्य होणार नाही. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे स्मारक समितीचे कर्तव्य आहे. सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात टाकणे उचित नाही. तेव्हा तारखेनुसार १४ ऑक्टोबर रोजी तसेच विजयादशमी २५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर न येता घरीच बुद्धवंदना तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन समितीने केले आहे. पुढील महिन्यात पत्रपरिषद घेऊन धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा रद्द झाल्याची माहिती पुन्हा एकदा दिली जाईल, असे स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर एस. फुलझेले यांनी कळविले आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top