Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादकते नुसार शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असलेल्या मालाच्या एकरी खरेदीची मर्यादा वाढविण्यात यावी - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - शेतकरी बांधव विविध पिकांचे उत्पन्न घेत असतात. खरीप हंगामात कापुस, सोयाबीन व तुर तर रबी हंगामात हरभरा...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
शेतकरी बांधव विविध पिकांचे उत्पन्न घेत असतात. खरीप हंगामात कापुस, सोयाबीन व तुर तर रबी हंगामात हरभरा, गहु या पिकांचे उत्पन्न घेत असतो. शेतकरी आपला माल स्थानिक बाजारपेठेत विकत असतो. परंतु कधी-कधी बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे किमांन आधारभुत किंमत देण्यासाठी काही कृषी मालाची खरेदी शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असते. जसे कापसाची खरेदी सीसीआय किंवा महाकॉट मार्फत तर सोयाबिन, तुर या पिकांची खरेदी नाफेड मार्फत होत असते. परंतु हे करीत असतांना शेतकऱ्यांकडुन फक्त मर्यादीत उत्पन्नच या एजन्सी मार्फत खरेदी केल्या जाते. उदा. कापुस एकरी 10 क्विंटल तर तुर, हरभरा व सोयाबीन यांची सुध्दा मर्यादा ठरविली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेला आपला जास्तीचा माल व्यापाऱ्यांना पडेल त्या भावात विकावा लागतो त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत असते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादकते नुसार शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असलेल्या मालाच्या एकरी खरेदीची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली आहे. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्या धोरणानुसार  शेतकरी नव नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपली उत्पादकता वाढवित आहे. कापुस पिकामध्ये बि-टी तंत्रज्ञान आल्यापासुन पिकांची उत्पादकता वाढलेली आहे. एकरी 20 क्विंटल पर्यंत शेतकरी कापुस पिकाचे उत्पादन घेत आहे. हरभरा मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 10 क्विंटल उत्पन्न शेतकरी घेत आहे. सोयाबीन व तुर मध्ये सुध्दा उत्पादकता वाढलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनमान्य एजन्सी मार्फत खरेदी होत असतांना एकरी उत्पन्नाची जी मर्यादा घातली आहे ती वाढविण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल यासाठी शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादकते नुसार शासनाने नेमलेल्या एजन्सी मार्फत होत असलेल्या मालाच्या एकरी खरेदीची मर्यादा वाढविण्यात यावी हि मागणी राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदान्द्वारे केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top