Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यात 24 तासात 315 नवे बाधित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपचार सुरु असणारे बाधित 2416 बाधितांची एकूण संख्या  5568 चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3086 बाधितांना डिस्चार्ज आज पर्यंत 60 बाधितांचा मृत्य...

  • उपचार सुरु असणारे बाधित 2416
  • बाधितांची एकूण संख्या  5568
  • चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 3086 बाधितांना डिस्चार्ज
  • आज पर्यंत 60 बाधितांचा मृत्यू
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
आज जिल्ह्यात 315 बाधितांची नोंद झाली असून आता कोरोना बाधितांची एकूण संख्या 5568 झाली आहे. कोरोना पादुर्भाव रोखण्याकरिता चंद्रपूर, बल्लारपूर शहरात जनता कर्फ्यूचा आज तीसरा दिवस असून जनता कर्फ्यू असतांना देखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत. 
जिल्ह्यात आत्तापर्यंत 3086 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
सध्या जिल्ह्यामध्ये 2416 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 3086 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 60 सह एकूण 66 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 
दरम्यान ही वाढती संख्या पाहता सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, सुरक्षा बाळगावी आणि आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top