Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडी पोलीस आणि गावकऱ्यांची संयुक्त शोधमोहीम सुरूच! राजुरा (दि. २९ जुलै २०२५) –          तालुक्या...
कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडी
पोलीस आणि गावकऱ्यांची संयुक्त शोधमोहीम सुरूच!
राजुरा (दि. २९ जुलै २०२५) – 
        तालुक्यातील कढोली बुज येथील ३० वर्षीय दीपक बोबडे या युवकाने वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी (२८ जुलै) संध्याकाळी घडली. सध्या पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू असून दीपक अद्यापही बेपत्ता आहे. पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात येत असून पोलीस हवालदार संदीप मेश्राम, शिपाई गणेश मडावी, शिपाई मंगेश वानखेडे, शिपाई अतुल बन्सोड, शिपाई वैभव ठाकरे, तसेच स्थानिक पोहणारे व स्वयंसेवक मदतीस उतरले आहेत.

        मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बोबडे हा कढोली बुज येथे टायर पंचरचे काम करत होता. रविवारी संध्याकाळी त्याने वर्धा नदीत उडी घेतली. त्याने नदीत उडी का घेतली हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ पोलीसांना कळवले. रात्रभर अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शोधमोहीमेत अडथळे आले. आज सकाळपासून शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले असून पोलीस सतर्कतेने काम करत आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top