माणिकगड ठिय्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल!
चंद्रपूर (दि. १३ जून २०२५) –
कोरपना तालुक्यातील कुसुंबी-नोकारी-बाम्बेझरी शिवारात माणिकगड सिमेंट (अल्ट्राटेक युनिट) कंपनीच्या उत्खनन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी कोलाम समाजाने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. तब्बल ७ महिन्यांच्या सलग आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित होणार आहे.
गेल्या बारा वर्षांपासून कंपनीच्या भूमिगत उत्खनन प्रकल्पामुळे कोलाम आदिवासी समाजाचे शेत, पाणी स्रोत, आणि धार्मिक स्थळांवर घात झाला. शासनाच्या दुर्लक्षामुळे न्यायासाठी आदिवासी समाजाने मानवाधिकार आयोग, अनुसूचित जनजाती आयोग व मुख्यमंत्र्यांकडे सतत अर्ज सादर केले. मात्र कुठलीही ठोस चौकशी किंवा कार्यवाही झाली नाही.
या आंदोलनात महिलांसह वयोवृद्ध नागरिक देखील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल करून दडपशाही केली. मात्र, कंपनीने लीजविना जमिनीवर कब्जा करून बेकायदेशीर बांधकाम, रस्ते अडथळा, मंदिर प्रवेश बंदी, शेतकऱ्यांचे हक्क डावलणे यासारखे गंभीर गुन्हे केले असतानाही कारवाई टाळण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून जिल्हा प्रशासनाकडे प्रश्न सोडवण्याचा आग्रह धरला. परिणामी, १८ जून रोजी राजुरा येथे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.