Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: वीजपुरवठ्यावरून आ. सुधीर मुनगंटीवार संतप्त – जनआंदोलनाचा इशारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वीजपुरवठ्यावरून आ. सुधीर मुनगंटीवार संतप्त – जनआंदोलनाचा इशारा पोंभुर्ण्यात वीजपुरवठा ठप्प – भाजप आक्रमक भूमिकेत आमचा विदर्भ - अनंता गोखरे च...
वीजपुरवठ्यावरून आ. सुधीर मुनगंटीवार संतप्त – जनआंदोलनाचा इशारा
पोंभुर्ण्यात वीजपुरवठा ठप्प – भाजप आक्रमक भूमिकेत
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २३ जून २०२५) -
        पोंभुर्णा तालुक्यात सतत होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत झाले असून, त्याचा परिणाम शिक्षण, शेती, आरोग्य सेवा आणि उद्योगधंद्यांवर होत आहे. या गंभीर स्थितीबाबत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला तत्काळ सुधारणा न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

        आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, "वीज वितरण व्यवस्थेमध्ये नियोजनाचा पूर्ण अभाव असून, यंत्रणेतील उदासीनतेमुळे सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. वेळेवर ट्रान्सफॉर्मर बदलले जात नाहीत, दुरुस्तीला वेळ लागतो, परिणामी एकदा वीज गेली की अनेक तासांनीच येते." शाळा, महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया, शेतीतील पाणीपुरवठा, हॉस्पिटल्समधील सेवा, तसेच लघुउद्योजकांना या वीज खंडनामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. या संदर्भात नागरिक, शेतकरी व व्यावसायिकांनी थेट आमदार मुनगंटीवार यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत.

        आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, "यंत्रणांनी जर जनतेच्या भावना समजून घेत तात्काळ सुधारणा न केल्या, तर भारतीय जनता पक्ष जनतेसोबत रस्त्यावर उतरून वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारेल." प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top