आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 26 मे 2024) -
ग्रामीण भागातील शाळा चांगले शैक्षणिक कार्य करीत असून या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी आपण कुठेच मागे नसल्याचे स्वकर्तृत्वातून सिध्द केले आहे. यापुढेही ही शैक्षणिक प्रगती कायम राहून उच्च शिक्षणातही आपली अशीच प्रगती कायम ठेवतील. स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्विकारून ते यशस्वी झाल्याबद्दल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप शुभेच्छा देत या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
राजुरा तालुक्यातील भेंडाळा येथील इयत्ता बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी घरी जाऊन सत्कार केला. इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, विरूर स्टेशन येथील इयत्ता बारावीतील कु. सानिका संजय ढवस, कु. साक्षी प्रभाकर ढवस व कु. दिक्षा संतोष निकोडे या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीनींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. यावेळी ॲड.वामनराव चटप यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजुरा बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रभाकर ढवस, पं.स. माजी उपसभापती आबाजी ढवस, उपसरपंच दिनेश वसाके, मधुकर चिंचोलकर, केतन जुनघरे, बापुजी ढवस, नामदेव ढवस, सागर ढवस, समिर ढवस, कल्पना ढवस, लीला ढवस, शीतल लेडांगे, सुनिता ढवस, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra
#chandrapur #rajura #bhendala #advwamanraochatap #student
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.