- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच
- जिल्ह्यात मंगळवारी 98 कोरोनामुक्त, 352 बाधित तर 1 मृत्यु
- ॲक्टीव्ह रुग्ण 1833
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 145, चंद्रपूर 45, बल्लारपूर 31, भद्रावती 9, ब्रह्मपुरी 6, नागभीड 7, सिंदेवाही 1, मुल 22, सावली 5, पोंभूर्णा 2, गोंडपिपरी 2, राजुरा 15, चिमूर 22, वरोरा 17, तर कोरपना 17, जिवती येथे 6 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 91 हजार 258 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 879 झाली आहे. सध्या 1833 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 23 हजार 189 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 30 हजार 425 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1546 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.