धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथील लिपिक वामनराव सोनपितरे यांचा मुलगा आशीष वय 23 याचा ऐन दिवाळीच्या दिवशी वडगाव येथे स्वतःच्या शेतातील बंधाऱ्यातिल गाळात पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे सोनपितरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आशिष हा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचा माजी विद्यार्थी असून त्याने नुकताच चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात एम.एस.सी (फिजीक्स) प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. 4 नोव्हेंबर ला दुपारी 1 च्या दरम्यान शेतातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाइप दुरुस्ती करताना पाय घसरला व पाण्यातील गाळात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला,ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री वडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, काका, काकू तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे. आशीष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ चे संचालक रामचंद्र सोनपितरे यांचा तो पुतण्या होता. आशिषच्या अकालीमृत्यू ने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.