Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नदीवर पुल नसल्याने नदीच्या पाण्यातून काढावी लागते वाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नदीला जास्त पाणी आल्याने शेतीच्या कामाला लागतोय ब्रेक शिव रस्ते व पांदण रस्त्या अभावी शेती करणे झाले कठीण कुठली आहे हि समस्या... वाचा सविस्त...
  • नदीला जास्त पाणी आल्याने शेतीच्या कामाला लागतोय ब्रेक
  • शिव रस्ते व पांदण रस्त्या अभावी शेती करणे झाले कठीण
  • कुठली आहे हि समस्या... वाचा सविस्तर......
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
कापसी येथील शेतकऱ्यांना नदी ओलांडून शेतात जावे लागते. नदीवर पुल नसल्यामुळे शेतात जाता येत नाही. त्यामुळे शेतीच्या कामाला ब्रेक लागला आहे. शिव रस्ते व पांदण रस्त्या अभावी शेती करणे झाले कठीण झाले आहे. 
रस्ते हे देशाच्या विकासाचे महत्त्वाचे साधन आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतापर्यंत रस्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शेतामध्ये पोहचण्यासाठी रस्ता महत्त्वाचा आहे. शेती कामासाठी मनुष्य बळाची कमतरता भासत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्याच्या अभावामुळे शेतापर्यंत यंत्रसामग्री पोहचवण्यात अडचणी येतात. तसेच शेतमाल बाजारपेठे पर्यंत नेण्यासाठीही अडथळा निर्माण होतो. पावसाळ्यात शेतात पाणी साचल्याने व चिखलामुळे वाहतूक करणे त्रासदायक होते. ग्रामीण भागात रस्त्याच्या कारणावरून अडचणी निर्माण होतात. तसेच रस्त्याची कामे प्रलंबित पडतात. शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहचवण्यात अडचणी येतात. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते हे नुकसान होवू नये म्हणून शासनाने शिव रस्ते व पांदण रस्ते खुले करण्याची योजना जलद गतीने राबवावी व शेतकऱ्यांना शेत रस्ते खुले करून द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top