- 6 वर्षानंतर पुन्हा एकदा दारू विक्रीला प्रारंभ
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा / गडचांदूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामांची प्रतीक्षा एकदाची संपली मद्यशौकीन ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज उजाडला. 1 एप्रिल 2015 रोजी जिल्ह्यात दारू बंद झाली होती, तर 27 मे 2021 च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार ती पुन्हा सुरू होत आहेत. 6 वर्षे कायद्याने तळीरामांच्या घशाला कोरड पडली होती पण आज राजुरा शहरातील नाका नं. 3 येथील एका देशी दारूच्या दुकानातून विक्री सुरु झाली. वैध दारूवाचून 6 वर्षांपासून हिरमुसले झालेल्या तळीरामांच्या आनंदाला आज पारावर उरला नाही. दुकान सुरू होताच तळीरामांची जत्राच भरली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. नाका नं. 3 ची गर्दी पाहण्यासाठीही न पिणाऱ्यांनी हि गर्दी केली होती. एकदाची सुरु झाल्याने प्रशासनाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार असून तळीरामांनाही वैध मिळणार आहे.
आमच्या गडचांदूर प्रतिनिधींनि पाठविलेल्या माहितीनुसार नांदाफाटा येथे दोन देशी दारूच्या दुकानातून विक्री सुरु झाली असून दारू दुकान उघडताच तळीरामांची गर्दी उसळली होती.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.