Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कधी भर उन्हात तर कधी पावसात नागरिकांच्या लसीकरण केंद्रावर रांगा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ढिसाळ नियोजनाचा फटका ; सोशल डिस्टेंसिंगचा पडलाय विसर अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाचा...
  • ढिसाळ नियोजनाचा फटका ; सोशल डिस्टेंसिंगचा पडलाय विसर
अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. अशातच लसीकरण केंद्रावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे लस घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातच आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान स्थानिक देशपांडे वाडीतील मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहासमोर लसीकरणाकरिता महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या असतांना पावसाने हजेरी दिली. यात नागरिकांना पावसात भिजत रांगेत उभे राहावे लागले. यामुळे प्रशासनाच्या नियोजनाची पोल खुलली असून नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

योग्य नियोजन न झाल्याने नागरिक संतप्त
एकीकडे प्रशासनाकडून मास्कचा वापर करा, हाथ वारंवार धुवा व सोशल डिस्टेंसिंग ठेवत त्रिसूत्रच्या अंमलबजावणीकरिता जनजागृती करण्यात येत आहे. परंतु प्रशासकीय व्यवस्थेकडूनच लसीकरणाकेंद्रावर योग्य नियोजन नसल्याने सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडतांना चे चित्र दिसत आहे. कधी उन्हातान्हात तर कधी भर पावसात भिजत सकाळपासूनच नागरिकांना लसीकरणाकरिता रांगेत उभे राहावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नंबर लावतेवेळी बसण्याकरिता कोणतीही व्यवस्था नाही. तासनतास उभे राहून लस मिळेल कि नाही याचीही शाश्वती नाही. दोन दिवस लसीकरण बंद होते. त्यामुळे सोमवारी गर्दी होणार हे स्पष्ट असतानाही कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. परिणामी नागरिकांची गर्दी तर झालीच शिवाय भर उन्हात व पावसात नागरिकांना रांगेत उभे राहावे लागले. एकीकडे ग्रामीण पातळीवरील लसीकरण उत्तमरीत्या नियोजन करून सुरु असतांना त्यातून बोध घेत शहरी विभागातही उत्तम नियोजन करून लसीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top