Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वनसडी-कारगाव (बु.) रस्त्याचे भूमिपूजन थाटात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मात्र कामाची सुरुवात कधी? संतप्त नागरिकांनी विचारला सवाल सदर कामाकडे अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स वनसडी -...

  • मात्र कामाची सुरुवात कधी?
  • संतप्त नागरिकांनी विचारला सवाल
  • सदर कामाकडे अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वनसडी -
कोरपना तालुक्यातील दोन तालुक्याशी जोडणारा वनसडी-पिपर्डा-कारगाव (बु) मार्गाचे खड़ीकरण व मजबुती करणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आले. ९-१० गावाला जोडणारा हा दुर्गम मार्ग समोर पकडीगुड्डम जलाशयाकडे जातो. या रस्त्याची दुरुस्ती करून डामरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. दोन महिन्यापूर्वी याकामाचे सर्वत्र गाजावाजा करत नारड फोडून थाटात भूमिपूजन संपन्न झाले होते. भूमिपूजनाचा थाट पाहून आता लगेच कामाला सुरुवात होऊन पावसाळ्या आधी काम पूर्ण होईल अश्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र कामाला अजूनही सुरुवात न झाल्याचे पाहता भूमिपूजनाचीच लगीन घाई होती कि काय असा खोचक सवाल नागरिकांनी केला आहे. भूमिपूजन होऊनही न लोकप्रतिनिधी, न संबंधित विभाग, न कंत्राटदार यांनी सदर कामाकडे दुर्लक्ष केल्याची ओरड आता नागरिक करीत आहे. 

या मार्गावर खड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून खड्याचे प्रमाण वाढले आहे. खड्डे असल्याने वाहन चालविणाऱ्या नागरिकांना कमालीची गैरसोय होत आहे. खड्यामुळे अपघाताचे प्रमाण हि वाढले असून पावसाळ्यापूर्वी सदर रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. करिता तात्काळ रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्याची मागणी कारगाव-मरकागोंदी-धनकदेवीयेरगव्हाण येथील नागरिकांनी केली आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top