- दोघेही वणी रहिवासी
यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. प्रभाकर भीमराव उईके वय ६५ रा. आमलोन आणि नामदेव रोडबा वाघाडे वय ६० रा. सोनेगाव अशी या शेतकऱ्यांची नावे असून ते दोघेही वणी तालुक्यातील रहिवासी आहेत.
प्रभाकर उईके यांनी सोमवारी दुपारी विषारी द्रव्य प्राषन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ मुकुटबन येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. नामदेव वाघाडे यांनी रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राषन केले. प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.