- विद्येला विनयतेची जोड असणे गरजेचे - दिपक महाराज पुरी
कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती जिवती च्या सभापती मा. अंजना ताई पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करून उज्वल भविष्य निर्माण करावे. पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक नाना साहेब देशमुख, विठ्ठल महाराज पुरी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कला व विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. एस.एच. शाक्य यांनी महाविद्यालयाचा वार्षिक लेखाजोखा व प्रगती बदल माहिती दिली व महाविद्यालयाच्या संदर्भात प्रकाश टाकला. विदर्भ महाविद्यालय जिवती हे सदैव विद्यार्थी हित लक्षात घेऊन कार्य करतात व येथील विद्यार्थी हे समाज उपयोगी कार्य करण्यास नेहमी तत्पर असतात. असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा राऊत यांनी केले तर आभार प्रा डॉ. पानघाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.