- दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले
- दारूबंदी उठवू नये म्हणून फक्त २५ हजार निवेदने आले
मुंबई -
दारूबंदी केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात अवैध दारूची विक्री वाढली होती. बनावट दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यूही झाला असून गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना २७ ऑगस्टला पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याची दारूबंदी उठवण्यासाठी स्थापन करण्यात येणारी समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या.
दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्य सरकारकडे २ लाख ४० हजार अर्ज निवेदने आले होते. तर दारूबंदी उठवू नये म्हणून फक्त २५ हजार निवेदने आले होते. त्यामुळे मंत्रालयात दारूबंदी उठवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काल मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत विचार करण्यात आला असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती दीड महिन्यात कॅबिनेटसमोर अहवाल सादर करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.