आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. २० जून २०२५) -
राज्यात खरीप हंगामाची सुरुवात दमदार पावसाने झाली होती. मृग नक्षत्र लागताच बळीराजाने मोठ्या आशेने कपाशी, सोयाबीन, तूर, धान आदी पिकांची पेरणी केली. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी, पेरलेले महागडे बियाणे नष्ट होण्याची वेळ आली असून, उगवलेली कोवळी पिके करपत चालली आहेत.
विशेषतः राजुरा तालुक्यातील अनेक भागांत ही स्थिती अधिक गंभीर झाली असून, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीमुळे आणखी खर्च उचलावा लागणार आहे, तर उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी संघटनांकडून शासनाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी केली जात आहे. सिंचन योजनेला गती देणे, आर्थिक मदतीची घोषणा करणे आणि शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी अनुदान देणे यांसारख्या गोष्टी त्वरित लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.