- अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे आवाहन
शहरातील ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीनुसार काही प्रतिष्ठीत ईलेक्ट्रॉनिक्स दुकानदार खोटे बोलुन सामान विक्री करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.
तक्रार ही कुलरच्या संर्दभातील असुन कुलर मधील मोटर कॉपर वाईंडींगची आहे असे सांगुन अँल्युमिनीयम वाईंडींगची मोटर असलेले कुलर कॉपर वाईंडींगच्या ज्यादा भावाने विकल्या जात आहे. शिवाय ग्राहकाने तक्रार केल्यास त्याला उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत. त्यामुळे साधारण ग्राहकांची ही फसवणुक आहे.
खऱ्या किंमतीपेक्षा जास्त किंमत सामानावर लिहुन ठेवतात आणि तुमच्या साठी कमी करतो म्हणुन सरळ दोन ते तिन हजार रूपये कमी करतात. यात ग्राहकाला कमी किंमत केल्याचे समाधान करून वाजवी किंमतीपेक्षा जास्त दराने सामान विक्री केले जाते. काही दुकानदार तर विकेलेले सामान खराब झाल्यास वॉरंटी संपेपर्यंत खोटे बोलुन वेळ काढुन घेतात आणि वॉरंटी संपली की हात वर करतात. त्यामुळे शहरातील सर्व दुकानदार बांधवांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावे अशी विनंती ग्राहक पंचायतने केली आहे. आता पुन्हा अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी शहरातील सर्व दुकानदारांना दिला आहे.
ग्राहकांना आवाहन
दरम्यान, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडुन सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की, जागृक बना. कुठल्याही सामानाची खरेदी करतांना पक्के बिल, गॅरंटी - वॉरंटी कार्ड घ्या. कोणत्याही दुकानदाराकडुन आपली फसवणुक झाली असे वाटल्यास, घेतलेल्या वस्तुमध्ये दोष आढळल्यास, दुकानदार वस्तु घेतल्यानंतर दोष असलेल्या वस्तु बदलुन किंवा दुरूस्त करून देत नसल्यास लेखी तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कड़े करावी.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.