चटप साहेबांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करताना कुठलीही सुरक्षा घेतली नाही. ते गेल्या चाळीस वर्षांपासून राजकिय व सामाजिक क्षेत्रात तसेच शेती व वकिली क्षेत्रात, आदिवासी बहुल भागातील गरजेचे प्रामुख्याने प्रश्न सोडविले, त्यांचा अनेक विषयात दांडगा अभ्यास असून ते दोनदा संसदपट्टू सुद्धा राहिले आहे. त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली .
यापुर्वी महाराष्ट्रातून हा पुरस्कार क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शिक्षणमहर्षी व बिहारचे राज्यपाल डी.वाय. पाटील या दोघांनाच मिळाला आहे. हा सन्मान मिळविणारे चटप साहेब महाराष्ट्रातून तिसरे व विदर्भातून पहिले व्यक्ती आहेत हे विशेष! तसेच जस्टिस फातिमा बिवी, जस्टिस पि. एन. भगवती, उस्ताद अमजद अली खान, अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले अशा अनेक नामवंत लोकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद राजुरा चे तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, विदर्भ युवा सचिव महिपाल मडावी, सचिव दिपक मडावी, नितीन सिडाम, जिल्हा युवा संघटक विश्वेश्वर मडावी, युवा तालुका उपाध्यक्ष संतोष मडावी, जिल्हा युवा सचिव शुभम आत्राम उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.