Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सहा महिन्यांपासून रखडलेले काम नागरिकांसाठी डोकेदुखी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सहा महिन्यांपासून रखडलेले काम नागरिकांसाठी डोकेदुखी काँग्रेसकडून गोल पुलिया रस्ता तातडीने सुरळीत करण्याची मागणी आमचा विदर्भ - राजेश अरोरा बल...
सहा महिन्यांपासून रखडलेले काम नागरिकांसाठी डोकेदुखी
काँग्रेसकडून गोल पुलिया रस्ता तातडीने सुरळीत करण्याची मागणी
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ३० ऑगस्ट २०२५) -
        महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली गोल पुलिया मार्गावरील रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले.
        निवेदनात नमूद करण्यात आले की, गोल पुलिया विस्तारीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. मात्र या कामामुळे गोल पुलियामधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे विभागाकडून कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ वाढली असून, रेल्वे विभागाकडून पुलियाच्या एका बाजूने बांधकामाच्या नावाखाली अर्धा रस्ता अडवून ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

        या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे विभाग, महसूल विभाग तसेच पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निवेदन सादर करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, आनंद कटारे, नरसिंह रेब्बावर, लखपती घुगलोट यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#BallarpurNews #CongressDemand #GolPuliyaIssue #RoadWoes #PublicSafety #ChandrapurUpdates #CivicProblems #devendraarya #ghanshyammulchandani #chayamadavi #bhaskarmakode #ballarpurrailway #ballarpurpolice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top