Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धान्य वितरणातील गोंधळामुळे लाभार्थ्यांचे हाल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धान्य वितरणातील गोंधळामुळे लाभार्थ्यांचे हाल तीन महिन्यांच्या रेशनपासून नागरिक वंचित आमचा विदर्भ - अविनाश रामटेके विरूर स्टेशन (राजुरा) (दि....
धान्य वितरणातील गोंधळामुळे लाभार्थ्यांचे हाल
तीन महिन्यांच्या रेशनपासून नागरिक वंचित
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (राजुरा) (दि. ०७ ऑगस्ट २०२५) -
        सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून दर महा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या वाटपात यंदा शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हजारो गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचे रेशन एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अडचणी आणि तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लाभार्थ्यांना या काळात धान्य मिळालेले नाही.

        प्राथमिक टप्प्यात जरी मशीनवर तीनही महिन्यांचे धान्य दाखवले जात होते, तरी सध्या केवळ ऑगस्ट महिन्याचेच रेशन दिसत आहे. जून व जुलै महिन्यांचे रेशन ‘गायब’ झाल्याचे चित्र अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसामुळे, आजारपणामुळे किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे वेळेत रेशन घेऊ न शकलेले कार्डधारक आता रेशनहून वंचित झाले आहेत.

        याशिवाय, काही ठिकाणी गोदामांमध्ये पुरेसा साठा नसल्यामुळे रेशन दुकानांपर्यंत माल पोहोचलेलाच नाही. सततचा सर्व्हर डाऊनचा त्रासही रेशन वाटपात अडथळा ठरत आहे. परिणामी, कार्डधारक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली आहे. “आमचं मागचं रेशन गेलं कुठे?” असा प्रश्न विचारत अनेक कार्डधारक दुकानदारांकडे तगादा लावत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य गरजू नागरिकांना फटका बसत असून, शासनाने तातडीने यात लक्ष घालून मागील महिन्यांचे धान्य उर्वरित पात्र लाभार्थ्यांना वितरित करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

#RationSystemFailure #FoodRightsForAll #PublicDistributionChaos #WhereIsOurRation #CitizensDeserveBetter #JuneJulyRationMissing #ServerDownCrisis #PoorSufferInSilence #FixPDSNow #VidarbhaVoices #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top