Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: माणिकगड सिमेंट प्रकल्पाविरोधात आदिवासी कोलाम समाजाचा एल्गार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माणिकगड सिमेंट प्रकल्पाविरोधात आदिवासी कोलाम समाजाचा एल्गार हापरमध्ये काम बंद आंदोलन गडचांदूर (दि. २४ जून २०२५) -         जनसत्याग्रह आदिवास...
माणिकगड सिमेंट प्रकल्पाविरोधात आदिवासी कोलाम समाजाचा एल्गार
हापरमध्ये काम बंद आंदोलन
गडचांदूर (दि. २४ जून २०२५) -
        जनसत्याग्रह आदिवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आदिवासी कोलाम समाजाने माणिकगड सिमेंट कंपनी प्रकल्पाविरोधात हापर येथे ठिय्या आंदोलन छेडले असून, काम बंद पाडण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या प्रश्नावर अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने आदिवासींचा संयम सुटला आहे.

        या प्रकल्पासाठी कुसुंबी, नोकारी आणि बॉम्बेझरी या गावातील आदिवासी कोलाम समाजाच्या जमिनी वापरण्यात आल्या. मात्र, त्यांच्या पुनर्वसनाचा किंवा रोजगाराचा कोणताही कायदेशीर निर्णय आजतागायत झालेला नाही. या जमिनीच्या मोबदल्यात कोलाम कुटुंबाला रोजगार दिला गेलेला नाही. एकूण १८ कोलाम कुटुंबांची जमीन बेकायदेशीररीत्या हस्तगत केल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे.

        या प्रश्नावर उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सभा, जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन बैठकी, पालकमंत्र्यांसोबत एक बैठक आणि नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तक्रारीचे अहवाल तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी, अनुसूचित जमाती आयोग व मानव अधिकार आयोगाकडे पाठवले गेले असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी म्हटले की, "आमच्या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला, पण आमचं अस्तित्वच नाकारलं गेलं. पोलीस व प्रशासन फक्त दबाव टाकतात, पण न्याय देत नाहीत. आमच्या लोकांवर ८ गुन्हे दाखल झालेत पण कंपनीवर एकही नाही." 

        कंपनीने पेट्रोल पंप, रस्ते, शेतजमिनींवर कब्जा, पाण्याचे स्त्रोत नष्ट करणे, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय रस्त्यांचे उत्खनन, सीमा बदलणे, आणि रजिस्ट्रीत फेरफार करून सातबारा कंपनीच्या नावावर नोंदविणे अशा गंभीर गैरप्रकार केले आहेत, असे आरोप आदिवासींनी लावले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शंकर मूर्तीजवळ महिला आणि पुरुष ठिय्या आंदोलन करत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यावेळी आदिवासींची भूमिका ठाम असून "जमिनी परत द्या किंवा मोबदला द्या, अन्यथा जेलमध्ये टाका", असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, या वेळेस निर्णायक भूमिका घेतल्याशिवाय ते उठणार नाहीत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top