खड्यामुळे वाहनचालकांचे जीव टांगणीला
या मार्गावरून वाहन चालवणे कठीण
मनसे ने दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर-नांदाफाटा-अंतरगाव पर्यंतच्या महामार्गावर लहान मोठे खड्डेच खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना या मार्गावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. पावसाळयाचे दिवस सुरू असल्याने त्या खड्यामध्ये पाणी साचल्यामुळे ये-जा करणाऱ्या जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे शिवाजी चौका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.
राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासंदर्भात सहा कोटी रूपये मंजूर झाल्याचे सांगीतले व रस्त्याचे बिबी गाव येथे भूमीपुजन करून सा.बां. विभाग यांनी कामही सुरू केले. अंदाजे दोन किलो मीटर पर्यंत डांबरीकरण करण्यात आले परंतु त्या समोर उर्वरीत असलेले पाच ते महा किलो मीटर पर्यंतचे काम करण्यात आले नाही. बिबी ते नांदाफाटा पर्यंत नुतनीकरणाचे काम अजुनही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे खड्डे बुझवण्याच्या नावावर फक्त मुरूम खड्ड्यात भरले आहे. ये जा करणाऱ्या वाहनांमुळे आता मुरुमचा धूळ उडत असल्यामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. धुराने रास्त्यावर डोळे उघडणे कठीण झाल्यामुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे. त्या मार्गावर अल्ट्राटेक सिमेन्ट कंपनी, दालमीया सिमेन्ट कंपनीतील ट्रान्सपोर्ट कंपनीची मोठे ट्रक, टिप्पर, टेंकर तसेच कंपनीत काम करणारे कामगार तसेच शालेय विद्यार्थी फार मोठया प्रमाणात त्या रस्त्याने ये जा करित असतात. रस्त्यावरचे पडलेले खड्डे चुकवायला जाव तर जीव जाण्याची भिती असते. सदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व धुळामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून या रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे लोकांना सतत संकटाला तोड द्यावे लागत आहे. या सर्व बाबींची योग्य ती दखल घेऊन त्वरीत काम सुरू करूण पूर्ण करण्याची मागणी मनसेचे चंद्रप्रकाश बोरकर यांनी केली आहे. दहा दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे शिवाजी चौका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.