मनसे ने सुरू केले अन्नत्याग आंदोलन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
स्वतंत्रता मिळण्याअगोदारच्या आधीकाळापासून जिवती तालुक्यात लोक वास्तव्यास असून देशाने 75 वा अमृत महोत्सव नुकताच साजरा केला. परंतु जिवती तहसील येथील गावातील शेवटच्या गावापर्यंत रस्ता उपलब्ध नाही ही शोकांतिका आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांनी जिवती तहसील येथे मोठ्या प्रमाणात पक्के रस्त्याचे काम सुरू केले व त्यातच भोयेगाव ते परमडोली कोटा पर्यंतचे महामार्ग एका महिन्यात उखडून चिखलमय झाला व भेंडवी घाट ते परमडोली पर्यंतचा सुरू असलेला महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे नाईक नगर, चिखली, पाटण, तुमरीगुडा या गावातील महामार्ग, रस्ता अवघ्या पंधरा दिवसात उखडून गायब झाला या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या जिवती महिला तालुकाध्यक्ष शिवगंगा मठपती यांनी दिनांक 20 /08/ 2022 रोजी पासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.