आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
चंद्रपूर येथील इरई धरणाची पातळी सोमवारी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी 206.825 मिटरपर्यंत गेल्याने धरणाचे सातही दरवाजे 1.25 मिटरने उघडण्यात आले आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी ते वाढवून दिड मिटर करण्यात आले. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून, इरई धरणाच्या पाण्यामुळे इरई नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडल्याने वर्धा नदी तुंबली आहे. इरई धरणाचेही दारे उघडल्याने ही या नदीतील पाणी वाहून जाण्यास अडचण होणार असल्याने नदीकाठीच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.