चंद्रपूर -
रक्तदान ही मानवतेची एक महान सेवा आहे कारण ती एका मानवाने दुसऱ्याला दिलेली अमूल्य भेट आहे. जिल्ह्यातील होतकरू तरुण नियमितपणे रक्तदान करून मानवतेचे कर्तव्य बजावत आहेत. त्याच अनुषंगाने भारतीय जैन संघटना चंद्रपुर सिटी विंग यांचे कडून चंद्रपुरातील रक्तपेढीत रक्ताची कमतरता पाहता 29 ऑगस्ट रोजी खजांची भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 70 लोकांनी रक्तदान करत मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. यावेळी भारतीय जैन संघटना चंद्रपुर सिटी विंगचे देवेंद्र पारख, आनंद तालेरा, अमित खजांची, अनिकेत लुनावत, सुमित लुनावत, स्वदेश गांधी, ऋषभ सकलेचा, चेतन जांबड़, महावीर बोथरा, अनमोल खटोड़, निखिल दाहाले, ऋषभ पुगलिया उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.